Saturday, July 7, 2012

I am Blank…





मला माहीत असलेल्या बहुतेक सगळ्या भावना माझ्या मनात भरून राहिल्या आहेत...  डोळ्यात येऊ पाहणारं पाणी नक्की सुखाचं आहे का वेदनेचं ? चेहरयावर उमटलेली स्मितरेषा नक्की कुठून आली आणि कशी? या विचारांनी माझं डोकं फुटेल का काय अस वाटत आहे, माझं ह्रदय आता कोणत्याही क्षणी बंद पडेल...


आज ती खूप आनंदी आहे... आणि मी?
माझ्याबद्दल मलाच खात्री नाही, मी खरंच सुखी आणि समाधानी आहे, का तसं वाटून घेण्याची सवय लागली आहे, माहित नाही.


मला ना खुप रडायचय, पण डोळ्यातलं पाणी पापण्यांपर्यंत येउन तिथूनच आत जातय, जणू काही डोळ्यावर अदृश्य अशी पट्टी बांधली आहे, बहुधा मी रडणच विसरलोय, मनातली दुख अन अश्रु इतके आत दाबून ठेवायची सवय झालिये की आता ठरवल तरी रडता येत नाहीये आणि हसण म्हणजे जणू काही त्या Batman मधल्या जोकर सारख कायमच चेहरयाला  चिकटलय...


हे सगळं निव्वळ तिच्या एका sms मुळे...
असं काय आहे त्या sms मधे? फ़क्त २ वाक्यं अन त्यात सुद्धा सगळे मिळून 8 शब्द...
"आता विमानात बसले आहे, आता थोड्याच वेळात भुर्र्रर्रर्रर :-)"


या क्षणाला तिच्या इतकं आनंदी दुसरं कुणी नसेल अन माझ्या एवढा confuse सुद्धा... ती आनंदी कारण ज्या गोष्टीचा ध्यास घेउन तिने जे कष्ट घेतले आज त्याचं फळ तिला मिळाल आहे... MIT मधे MS साठी Admission मिलणं आणि ते पण पूर्ण Scholarship वर हे नक्कीच कौतुकास्पद आहे... तिने घेतलेल्या अपार कष्टांची ती पावतीच आहे.


तस पहायला गेलं तर तिची-माझी ओळख काही फार जुनी नाही, गेल्या २-3 वर्षातली. अगदीच अनापेक्षित आणि अचानक, पण कुठल्या जन्माची लय जुळली माहित नाही अन् अनेकांना हेवा वाटावा अशी मैत्री झाली. माझ्यासाठी ती म्हणजे जणू कही "मैत्री" स्वत:च मानवी देह घेउन आली होती, तिच्यासाठी मी म्हणजे जणू मैत्रीचं जिवंत उदाहरण, तिला माझ्याबद्दल खुप अभिमान... दोघांना एकमेकांची एवढी ओळख झाली होती की संवाद साधायला कधी शब्दांची गरज पडलीच नाही. एकमेकांच्या मनातल्या भावना नुसत्या डोळ्यांनी टिपून घेऊ शकतो आम्ही, अगदी आजही... एखादा मिस कॉल किंवा How r u? सारखा msg  देखिल त्यात न लिहिलेले बरेच शब्द, न बोललेल्या बऱ्याच भावना आपोआप एकमेकांपर्यंत पोचवतो...


गेले काही दिवस तिच्यासोबत शॉपिंग करताना, तिचे पॅकिंग करून देताना, तिच्यासाठी विमानाची तिकिटं बुक करताना मनामधे ही जाणीव सतत जागी होती की आता नेहमीच्या भेटीगाठी नाहीत, विनाकारण मिसकॉल देणं नाही की फालतू msg नाहीत, वीक एंड्स च भटकण नाही, पावसातून भिजुन आल्यावर तिच्या हातची कॉफी नाही, रुसवे-फुगवे अन् भांडणं नाहीत, पण कधी एवढा भावुक नाही झालो, उलट तीचं सिलेक्शन झाल्याचं कळल्यावर आपणच तिला दगडूशेठ ला घेउन गेलो, अगदी काल तिला मुंबईच्या बसमध्यॆ बसवून देताना पण अगदी बिनधास्त होतो, मग आजच हा त्रास का? का असं वाटत आहे की तिला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नयॆ, आत्ता ती ज्या विमानात बसली असॆल त्यातून तिला काहीही करून परत आणावं अन् मग तिला  आपल्यापासून दूर कुठेच जाऊ दॆऊ नयॆ...




........च्यायला आजचा दिवसच बेकार, सकाळी सकाळी दूध नासलं, मग ऑफिस मधे त्या टकल्याशी वाजलं, संध्याकाळी येताना गाड़ी पंक्चर, दोन सिगारेटची पाकिटं अन् ४ लार्ज घेउन पण पाय अजून जमिनीवरच  आणि लिहायला म्हणून कागद पेन घेतलं तर असलं काहीतरी लिहिल जातय...

1 comment:

  1. भावुकता आणि तळमळ चांगली उतरली आहे.. असंच स्वाभाविकरित्या झालेलं लेखनच चांगलं असतं.
    लिहीत राहा...

    ReplyDelete